
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – सातत्याने सामाजिक उपक्रम घेणारे ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने उंचगाव परिसरातील १०० ज्येष्ठ नागरिक आणि गरजू यांना छत्री वाटप करण्यात आले. पावसाळ्यात देण्यात आलेल्या या छत्र्यांविषयी नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार आणि श्री. विजय देवणे, शहरप्रमुख श्री. रवीकिरण इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, उंचगावचे उपसरपंच विराग करी, सर्वश्री दीपक रेडेकर, दीपक पाटील, विक्रम चौगुले, संतोष चौगुले यांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी युवा पिढीस धर्माचरण शिकवून सुसंस्कृत पिढी घडवावी.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !