बेंगळुरूत आशियाई फुटबॉल स्पर्धा जिंकल्यावर २६ सहस्र भारतीय प्रेक्षकांनी गायले वन्दे मातरम् !

बेंगळुरू (कर्नाटक) – भारतीय फुटबॉल संघाने नेत्रदीपक कामगिरी करत ‘साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन’ ही दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा ९ व्यांदा जिंकली. अंतिम सामन्यात भारताने ‘पेनल्टी शूटआऊट’मध्ये कुवेतवर ५-४ अशा फारकाने मात केली. हा सामना बेंगळुरूतील श्री कांतीरावा स्टेडियम येथे पार पडला.

या वेळी उपस्थित २६ सहस्र प्रेक्षकांनी ‘वन्दे मातरम्’ गीत गायले . या रोमांचक क्षणाचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत.