

‘भक्तवात्सल्य’ हा आश्रम सुंदर भक्तीसुखे भरला ।
भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला ॥ धृ.॥
औषध विकता विकता स्वामी भक्तराज झाले ।
भवरोगावर औषध द्याया सिद्ध पहा झाले ।
साई श्रींच्या पूर्णकृपेने भाग्योदय झाला ॥ १ ॥
साई श्रींच्या पूर्ण कृपेने अंतरंग बदलले ।
बाह्यांगाने तरी योगी सामान्यची राहिले ।
जो जो आला चरणांपाशी प्रेमसुखे बहरला ॥ २ ॥
अहंतेची कुणा न बाधा सात्त्विक हे सगळे ।
गुरुचरणांशी सद़्भावाने रंगूनिया राहिले ।
नित्य मुक्त त्या अंतःस्थितीचा प्रत्यय हो आला ॥ ३ ॥
‘भक्तराज’ हे विराजित झाले भक्तीच्या हृदयी ।
कीर्ती झाली भारतभूवर रुजले ठायी ठायी ।
भक्तजनांच्या हृदयाकाशी कल्पतरू ठरला ॥ ४ ॥
सिद्धि होती प्राप्त, तरीही दूर तिला ठेविले ।
भक्तवत्सल भक्तांसाठी धावूनिया गेले ।
मातेपरी त्या भक्तजनांना पान्हा पाजियला ॥ ५ ॥
सिद्धांच्या या भेटीसाठी रामदासही आले ।
वात्सल्याचा पाहूनी आश्रम तृप्त मनी झाले ।
‘जय जय रघुवीर समर्थ’ गर्जने परिसर हा भरला ॥ ६ ॥
भजन, कीर्तनी अन् गायनी सगळे भक्त इथे रमले ।
राष्ट्रगुरूंच्या चरणदर्शने भारावून गेले ।
प्रेमपूर हा पाहूनी नयनी नारायण हसला ॥ ७ ॥
– ह.भ.प. नारायण श्रीपाद काणे (कीर्तनकार), दत्त मंदिर, मु.पो. कवठेगुळंंद, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.
(वर्ष २००३ पूर्वीचे काव्य)
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !