संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे

मुंबई – देशाचे नवीन संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. नवीन वास्तूमध्ये लोकशाहीचे औचित्य आणि गांभीर्य टिकून राहू दे. या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली. हा वाद झाला नसता, तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘ट्वीट’द्वारे व्यक्त केली.

या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचे प्रतीक आहे, ती लोकशाही टिकवण्यासाठी झटलेल्या सर्वांचे राज ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.