पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना नमन !

नवी देहली – २८ मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नमन केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आदी उपस्थित होते. या वेळी खासदारांनीही पुष्प वाहिले. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या आकाशवाणीवरील मासिक ‘मन की बात’ या कार्यक्रमातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी सांगितले होते. ते म्हणाले की, वीर सावरकर यांचा त्याग, साहास आणि संकल्प शक्ती यांच्या गाथा आजही आम्हाला प्रेरित करत आहेत. त्यांचे व्यक्तीमत्व हे वीरता आणि विशालता यांनी भरलेले होते. त्यांच्या निर्भीड आणि स्वाभिमानी स्वभावाला गुलामीची मानसिकता पटत नव्हती.
सौजन्य टाईम्स नाऊ
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !