
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा गडावर असलेल्या तानपीर मजारीची २५ मे या दिवशी पहाटे अज्ञातांनी नासधूस केली. नासधूस केल्यानंतर काही काळ पन्हाळा बंद ठेवण्यात आले होते. येथील वातावरण तणावग्रस्त होऊ नये; म्हणून पन्हाळा गडावर सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि गडावर जाण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. या मजारीची काही वेळानंतर परत डागडुजी करण्यात आली. या मजारीविषयी प्रसारमाध्यमांवर ८ दिवसांपासून काही संदेश प्रसारित होत आहेत.
या संदर्भात पन्हाळा पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘वातावरण निवळल्यानंतर सर्वांना प्रवेश देण्यात येईल. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका’, असे आवाहन केले आहे.
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !