
रत्नागिरी – ऑनलाईन सुविधा देतांना नागरिकांना येणार्या ‘नेटवर्क’ची समस्या लक्षात घेऊन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आर्.टि.ओ.) विनामूल्य ‘वाय फाय’ सुविधा चालू करण्यात आली आहे. महाराष्ट्रदिनापासून ही सुविधा चालू करण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांची कामेही जलद गतीने होत आहेत.
राज्याचा परिवहन विभागाच्या सुमारे ५८ सेवा ‘सारथी’ प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा याची बचत होत असून, कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे आता वाचले आहेत. नागरिकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येत आहे. त्यामुळे या विभागाचे कामही गतीमान झाले आहे;

मात्र भ्रमणभाषला असलेल्या ‘नेटवर्क’च्या अडचणीमुळे कार्यालयात येणार्या जनतेची गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर करण्याच्या हेतूने येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी कार्यालयात १ मेपासून विनामूल्य वायफाय सुविधा चालू केली आहे. त्यामुळे नागरिकांना या सुविधेमुळे ऑनलाईन सेवा जलद गतीने मिळणार आहेत.
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली