जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांची संख्या झाली अल्प ! – पोलीस महासंचालक  

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह (डावीकडे)

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद अद्याप संपला नसला, तरी तो संपत चालला आहे. आताच्या स्थितीत आतंकवाद्यांची संख्या मग ती स्थानिक असो कि पाकिस्तानातून आलेल्यांची असो, ती अल्प झाली आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

संपादकीय भूमिका

काश्मीरमधील आतंकवाद्यांची संख्या अल्प झाली, असे म्हटले, तरी अद्यापही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच आहेत. भारतातील कोणत्याही राज्यातील हिंदू तेथे जाऊन राहू शकत नाहीत, अशीच स्थिती आहे !