
कोल्हापूर – आध्यात्मिक कार्याला समाजकार्याची जोड देण्याची मोठी परंपरा असलेल्या सिद्धगिरी कणेरी मठ पंचक्रोशीत संपन्न होत असलेल्या ‘पंचमहाभूत लोकोत्सवातून युवा आणि बाल वर्गामध्ये पर्यावरणविषयक निर्माण झालेली जाणीव ही टप्प्याटप्प्याने विविध उपक्रमांतून सातत्याने विकसित होईल, हेच या उपक्रमाचे सर्वांत मोठे यश ठरेल, असे मत गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. ते पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘गोवा राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेनुसार ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला गती येण्यासाठी या पंचमहाभूत लोकोत्सवाचा मोठाच लाभ होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून एक मोठी लोकचळवळ आध्यात्मिक दिशादर्शनातून प्रारंभ होत आहे. याचे आपण साक्षीदार आहोत, याचा मनस्वी आनंद होत आहे.’’ या महोत्सवात सहभागी होण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकाळी कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !