९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

वर्धा, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – ग्रंथालय चळवळीमध्ये सर्वसामान्य लोक आहेत, त्यांना आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. आर्थिक निधीअभावी ग्रंथालयाचा विकास झाला नाही. ग्रंथालयातील कर्मचार्यांची नाळ ग्रंथांशी जोडली आहे. त्यामुळे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले; पण ग्रंथालये बंद केली नाहीत. वर्ष १९६७ मध्ये नियोजन आयोगाने ग्रंथालय चळवळीकडे लक्ष देण्यास सांगितले होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या चळवळीला केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून आर्थिक साहाय्य मिळण्याची आशा आहे, असे प्रतिपादन

डॉ. गजानन कोटेवार यांनी ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ‘ग्रंथालय चळवळीचे यशापयश’ या परिसंवादामध्ये बोलतांना केले.
भारताला महासत्ता बनवायचे असेल, तर ग्रंथ संस्कृती टिकली पाहिजे ! – श्याम जोशी, बदलापूर

परिसंवादाचे अध्यक्ष श्याम जोशी म्हणाले, ‘‘ग्रंथालय आणि ग्रंथपाल यांचा विकास झाला पाहिजे, साहित्य संमेलनाचा मूलाधार म्हणजे ग्रंथालय आहे. साहित्य संमेलनामध्ये ग्रंथपालाला प्रतिष्ठा मिळाली नाही, अद्यापपर्यंत एकाही ग्रंथपालाला राज्य पुरस्कार मिळालेला नाही; कारण शासनकर्त्यांनी ग्रंथांविषयीची संवेदनशीलता गमावली आहे. आतापर्यंत केवळ २ वेळ ग्रंथालयांच्या संदर्भात परिसंवाद ठेवण्यात आला आहे, हे ग्रंथालय चळवळीचे अपयश आहे. ग्रंथपालाला आदराचे स्थान देण्याची आवश्यकता आहे. भारताला महासत्ता बनवायचे असेल, तर ग्रंथ संस्कृती टिकली पाहिजे.’’
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !