देहलीच्या जंतरमंतर येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘जनआंदोलन’

देहली – ‘लव्ह जिहाद’च्या विरुद्ध लढण्यासाठी आवश्यकता असेल, तेथे उपस्थित रहायला मी सिद्ध आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये जर कोणत्याही मुलीची हत्या होत असेल, तर त्या प्रकरणाचा निपटारा ३० दिवसांच्या आत करण्यात यावा. तसेच त्या प्रकरणाचा खटला संपेेपर्यंत लव्ह जिहादीला जामीन देण्यात येऊ नये, असे प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. ‘हिंदु महाकुंभा’निमित्त ८ जानेवारी २०२३ या दिवशी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रमधील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथील जंतरमंतर येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनआंदोलन केले. त्या वेळी ते बोलत होते. या आंदोलनात ‘‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायदा करण्यात यावा’, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाचे आयोजन राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले होते.


पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी