देहलीच्या जंतरमंतर येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘जनआंदोलन’

देहली – ‘लव्ह जिहाद’च्या विरुद्ध लढण्यासाठी आवश्यकता असेल, तेथे उपस्थित रहायला मी सिद्ध आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये जर कोणत्याही मुलीची हत्या होत असेल, तर त्या प्रकरणाचा निपटारा ३० दिवसांच्या आत करण्यात यावा. तसेच त्या प्रकरणाचा खटला संपेेपर्यंत लव्ह जिहादीला जामीन देण्यात येऊ नये, असे प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. ‘हिंदु महाकुंभा’निमित्त ८ जानेवारी २०२३ या दिवशी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रमधील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथील जंतरमंतर येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनआंदोलन केले. त्या वेळी ते बोलत होते. या आंदोलनात ‘‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायदा करण्यात यावा’, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाचे आयोजन राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले होते.


४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !