व्‍यवसाय आणि राजकारण यांमध्‍ये मराठीचा टक्‍का अल्‍प होत आहे ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

पिंपरी-चिंचवड (जिल्‍हा पुणे) येथील १८ वी जागतिक मराठी परिषद

पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पिंपरी (जिल्‍हा पुणे) – मराठी माणूस हा शिक्षण झाल्‍यास नोकरीला प्राधान्‍य देतो. तो व्‍यवसाय करण्‍याचे धाडस करत नाही. मराठीचा टक्‍का व्‍यवसाय आणि राजकारण यांमध्‍ये अल्‍प झाला आहे. विश्‍लेषकांमध्‍येही अमराठी असणार्‍या व्‍यक्‍तींची नावे आहेत; मात्र मराठी नाव नाही. ही मानसिकता पालटायला हवी, यासाठी पुढाकार घ्‍यायला हवा, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्‍यक्‍त केले. ते पिंपरी-चिंचवडमध्‍ये आयोजित केलेल्‍या १८ व्‍या ‘जागतिक मराठी परिषदे’त बोलत होते. या वेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार, संमेलनाध्‍यक्ष डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे आदी उपस्‍थित होते.

या वेळी बोलतांना सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले की, मराठीच्‍या एक-एक शब्‍दात ऊर्जा आणि शक्‍ती आहे. मराठी भाषा जगात श्रेष्‍ठ व्‍हावी, ती जपली जावी याविषयीची सूचना देण्‍यासाठी ‘पोर्टल’ काढणार आहे.