
सातारा, ५ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जे वक्तव्य केले, ते त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. महापुरुषांवर बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘‘महापुरुषांचा अवमान जनता सहन करणार नाही. प्रत्येकानेच आपण काय बोलतो ?, कसे वागतो ? याविषयी आत्मपरीक्षण केले पाहिजे. नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचा वाडा हा ऐतिहासिक ठेवा आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून तो जतन केला जाईल. फुले दांपत्याचा त्याग हा प्रेरणादायी आहे.’’
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !