
नवी देहली – अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यामध्ये झालेल्या संघर्षाचे वृत्त जागातिक प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले आहे. यात त्यांनी भारतापेक्षा चीनच्या सैनिकांची अधिक हानी झाल्याचे म्हटले आहे.
१. हाँगकाँगच्या ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तात म्हटले आहे की, संघर्ष झाल्यानंतर दोन्ही सैन्य आपापल्या भागात परतले. यात २० भारतीय सैनिक घायाळ झाले आहेत. भारतापेक्षा चीनचे सैनिक अधिक संख्येने घायाळ झाले. भारत आणि अमेरिका येथील चीनच्या दूतावासाने या संघर्षाविषयी मौन बाळगले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यावर अद्याप काहीही सांगितलेले नाही.
Just days after China objected to US-India joint war games near the disputed border, Indian Army confirms there were clashes between Indian and Chinese troops in the highly sensitive Tawang sector of Arunachal Pradesh, which is claimed in full by China. https://t.co/SSuGnW8hfF
— Khushboo Razdan (@khushboo228) December 12, 2022
२. बीबीसीने म्हटले की, या संघर्षात भारतापेक्षा चिनी सैनिकांची अधिक हानी झाली आहे.
India and China troops clash on Arunachal Pradesh mountain border https://t.co/yPYJLFnpOW
— BBC News (World) (@BBCWorld) December 13, 2022
३. जर्मनीमधील ‘डी.डब्लू.’ने वृत्तसंस्था आणि भारतीय सैन्य यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत वृत्त दिले आहे. यात त्यांनी ‘चिनी सैनिक सीमेच्या अगदी जवळ आले होते. यानंतर भारतीय सैनिकांनी यावर प्रतिक्रिया दिली, असे म्हटले आहे.
४. पाकिस्तानमधील ‘डॉन’ने औली येथे अमेरिकेसमवेत झालेल्या सैनिकी सरावाला चीन आणि भारत यांच्यातील संघर्षाचे कारण सांगण्यात आले आहे. यात दोन्ही बाजूंचे काही सैनिक घायाळ झाले आहेत, असे म्हटले आहे.
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण