सनातन संस्थेच्या वतीने पहाडजंग, देहली येथे तणावमुक्ती विषयावर प्रवचनाचे आयोजन

पहाडजंग, देहली – आज आपल्या जीवनात तणावाची विविध कारणे आहेत. तणावमुक्त रहाण्यासाठी प्रतिदिन काही वेळ आत्मनिरीक्षण केले पाहिजे. आपल्या स्वत:च्या कृतींचे निरीक्षण करून आम्ही कुठे कुठे अयोग्य कृती किंवा चुकीचे आचरण केले, याचे निरीक्षण केले पाहिजे. यातून आपल्या व्यक्तीमत्त्वातील दोष सापडतील आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्न होतील. त्यामुळे आपल्याकडून योग्य कृती होतील. योग्य कृती आणि सकारात्मक विचार राहिले, तर जीवन आनंदमय होईल, तसेच आपला व्यक्तीमत्त्व विकास होण्यास साहाय्य होईल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने येथील नूतन मराठी सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये शिक्षिकांसाठी ‘तणावमुक्त जीवन कसे जगावे ?’, या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. गुलशन नागपाल यांनी ‘अशा प्रकारचे कार्यक्रम पुढेही घ्यावेत’, अशी विनंती केली.
Filmmaker Imtiaz Ali : चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांची ‘राधा-कृष्ण’ यांच्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा !
भित्तीपत्रक लावणार्या महिला अधिकार्याचे स्थानांतर ! – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त
देवस्थान इनाम भूमींच्या संदर्भातील प्रारूप सिद्ध करण्यासाठीच्या समितीत देवस्थानांच्या प्रतिनिधींचा समावेश !
(म्हणे) ‘हिंदूंना विभागण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागेल !’ – Maulana Sajjad Nomani
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिराच्या दानाची चोरी करणार्याच्या ७ पिढ्यांना शाप लागेल !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु एकता दिंडी’च्या संदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे !