(म्हणे) ‘हिंदूंना विभागण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागेल !’ – Maulana Sajjad Nomani

‘अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांचे मुसलमानांना आवाहन

मौलाना सज्जाद नोमानी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) –  मी धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) हिंदूंच्या संदर्भात निराश आहे. आपल्याला हिंदु समुदायाला विभागण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागेल, असे विधान ‘अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी एका सभेत केले.

(म्हणे) ‘भारतात हिंदू बहुसंख्य नाहीत !’

नोमानी पुढे म्हणाले की, जाट, लिंगायत यांसारख्या अनेक जाती स्वतःला हिंदु मानत नाहीत. शीख, बौद्ध, अनुसूचित जाती-जमाती आणि आदिवासी हेही हिंदु धर्माच्या बाहेरचे आहेत. तमिळनाडूतील लोकही हिंदू नाहीत. त्यामुळे भारतात हिंदू बहुसंख्य नाहीत. (हिंदू संघटित नसल्यानेच मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण होत आहेत आणि त्याला हिंदूंकडून प्रत्युत्तर दिले जात नाही, हे धर्मांध मुसलमानांना ठाऊक आहे. हिंदु जेव्हा संघटित होतील, तेव्हा धर्मांधांना पाकिस्तानात पळून जावे लागेल ! ही स्थिती आणण्यासाठी हिंदू कधी संघटित होणार ? – संपादक) 

संपादकीय भूमिका

हिंदू आधीच विभागले गेले आहेत, त्यामुळेच नोमानी अशा प्रकारचे विधान करण्याचे धाडस करू धजावत आहेत. हे हिंदूंना लज्जास्पद !