
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – प्रेमाच्या नावाखाली हिंदु मुलींची फसवणूक करून जिहाद करण्याचे काम आफताबसारख्या जिहादी वृत्तीकडून सर्वत्र होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी, तसेच ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लवकरच आणावा, या मागणीसाठी इचलकरंजी येथील मलाबादे चौकात विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गावाहिनीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘मातृशक्ती’ शहर संयोजिका सौ. स्मिता हंचनाळे म्हणाल्या, ‘‘युवती-महिला यांनी खोट्या प्रेमाच्या आमीषाला बळी पडू नये. फसवणूक होत असल्यास ‘मातृशक्ती’शी संपर्क साधावा. मातृशक्तीच्या वतीने घेण्यात येणार्या लाठी-काठी प्रशिक्षणात सहभागी होऊन स्वरक्षणाचे धडे घ्यावेत.’’
जनआक्रोश आंदोलनाचे प्रास्ताविक अमित कुंभार यांनी केले. या प्रसंगी शहरमंत्री प्रवीण सामंत, सोमेश्वर वाघमोडे, सनतकुमार दायमा, बाळासाहेब ओझा, अनिल सातपुते, अरुणा माने, कविता पसनूर, संगीता मस्के, दीपाली निकम, संगीता चव्हाण यांसह विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
समान नागरी कायदा हवा !
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !