
मुंबई – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल घोषित होण्याची प्रक्रिया १७ ऑक्टोबर या दिवशी करण्यात आली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भाजप ३९७ जागांवर निवडून आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या वेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाने ८१ जागा मिळवल्या. ठाकरे गटाने ८७ जागा, काँग्रेसने १०४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसने ९८, तर अपक्षांनी ९५ जागांवर विजय मिळवला आहे. रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे भरतशेठ गोगावले यांच्या खरवली गावातील सरपंचपद हे काँग्रेसचे चैतन्य महामुनकर यांच्याकडे गेले आहे. भंडारा जिल्ह्यात १७ पैकी ११ ठिकाणी शिंदे गटाने विजय मिळवला आहे. रत्नागिरीत ११ पैकी १० जागांवर ठाकरे गटाचा विजय झाला आहे.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री