
मुंबई – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल घोषित होण्याची प्रक्रिया १७ ऑक्टोबर या दिवशी करण्यात आली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भाजप ३९७ जागांवर निवडून आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या वेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाने ८१ जागा मिळवल्या. ठाकरे गटाने ८७ जागा, काँग्रेसने १०४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसने ९८, तर अपक्षांनी ९५ जागांवर विजय मिळवला आहे. रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे भरतशेठ गोगावले यांच्या खरवली गावातील सरपंचपद हे काँग्रेसचे चैतन्य महामुनकर यांच्याकडे गेले आहे. भंडारा जिल्ह्यात १७ पैकी ११ ठिकाणी शिंदे गटाने विजय मिळवला आहे. रत्नागिरीत ११ पैकी १० जागांवर ठाकरे गटाचा विजय झाला आहे.
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !