मुंबई – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल घोषित होण्याची प्रक्रिया १७ ऑक्टोबर या दिवशी करण्यात आली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भाजप ३९७ जागांवर निवडून आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या वेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाने ८१ जागा मिळवल्या. ठाकरे गटाने ८७ जागा, काँग्रेसने १०४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसने ९८, तर अपक्षांनी ९५ जागांवर विजय मिळवला आहे. रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे भरतशेठ गोगावले यांच्या खरवली गावातील सरपंचपद हे काँग्रेसचे चैतन्य महामुनकर यांच्याकडे गेले आहे. भंडारा जिल्ह्यात १७ पैकी ११ ठिकाणी शिंदे गटाने विजय मिळवला आहे. रत्नागिरीत ११ पैकी १० जागांवर ठाकरे गटाचा विजय झाला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत भाजप आघाडीवर !
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत भाजप आघाडीवर !
नूतन लेख
- सिंधुदुर्ग : सावंतवाडीत वन्यप्राण्यांसाठी पाण्याच्या कृत्रिम तळ्याची निर्मिती
- Delhi Liquor Scam : ‘ईडी’कडून गोव्यातील आप नेत्यांसह चौघांची चौकशी
- जात पडताळणी समितीकडून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रहित !
- अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश !
- शवविच्छेदन अहवाल अयोग्य दिल्याने उच्च न्यायालयाकडून आधुनिक वैद्यांवर कारवाईचे आदेश
- उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच लोकसभेची २ आवेदने भरली !