अबू आझमी यांचा तथ्यहीन आरोप !

सोलापूर – ज्या शहरांना मुसलमानांची नावे देण्यात आली आहेत, तीच नावे जाणीवपूर्वक पालटली जात आहेत. वर्ष १९६५ मध्ये भारत-चीन युद्धात मीर उस्मानअली यांनी ६ टन सोने भारत सरकारला दिले होते. अशा भारतीय व्यक्तीचे नाव राज्य सरकारला सहन झाले नाही, म्हणून त्यांनी ‘उस्मानाबाद’ शहराचे नाव पालटले. (याच निझामाला स्वातंत्र्यानंतर त्याचे ‘हैद्राबाद’ संस्थान भारतात समाविष्ट करायचे नव्हते. या निझामांच्या रझाकारांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. आझमी हे सत्य सोयीस्करपणे लपवत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक) नामांतराच्या सूत्रावरून सरकार हिंदु आणि मुसलमान यांच्यात विष पेरत आहे, असा तथ्यहीन आरोप समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केला.
आझमी पुढे म्हणाले की, देशातील सभ्यता, संस्कृती, बंधूभाव आणि सामाजिक एकोपा जाणीवपूर्वक नष्ट केला जात आहे. यामुळेच शाळा-महाविद्यालये यांमध्ये हिजाब (डोके आणि मान झाकण्यासाठी मुसलमान स्त्रियांनी वापरलेले वस्त्र) घालण्यास बंदी घातली जात आहे. (कन्हैयालाल, उमेश गुप्ता यांच्या हत्या, तसेच हिंदूंच्या मिरवणुकांवर धर्मांधांनी केलेले आक्रमण हा बंधूभाव होता का ? अशा घटनांच्या वेळी आझमी गप्प का रहातात ?, हे न कळायला जनता दूधखुळी नाही ! – संपादक) वर्ष २०१४ नंतर राजकारण पालटले आहे. केवळ हिंदु-मुसलमान वाद निर्माण करायचा आणि मते गोळा करायची, असे कारस्थान केले जात आहे. सध्या ‘सर्वांत चांगला हिंदू कोण ?’, अशी स्पर्धा चालू आहे. (मग आझमी यांना त्याचा पोटशूळ का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉसिटीव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
Vande Mataram : ‘वन्दे मातरम्’चा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास होणार !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण