
एक तुझे नाम । शास्त्रांचा आधार ।
वेदांच्या जे पार । तत्त्व तुझे ।।
कलियुगी धर्म हा कोसांतरी ।
नामचि तारेल भवसागरी ।।
प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘एक तुझे नाम ।’ या भजनपंक्तींद्वारे नामाचे महत्त्व वर्णिले आहे. नामाविना ईश्वराची अनुभूती येत नाही. ईश्वरप्राप्ती करून घेण्याचे वेगवेगळे साधनामार्ग आहेत. दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणाऱ्या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात् साधना अखंड चालू राहील असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामयोग ! गवत आणि अग्नी एकत्र आले की, गवत जळते अन् जळून अग्नीरूप होते. भगवंताचे नाम घेतले, तर नाम सारी पापे जाळून टाकते आणि भक्त भगवंताशी एकरूप होतो. असे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या भगवंताच्या नामात रंगून जाणेच हितकारक !
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – सुगम भक्तीयोग)
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी नवीन प्रश्न विचारण्याची कारणे आणि त्यांचे होणारे लाभ