ईशान्य भारतात संकट आल्यानंतर असा चमत्कार घडतो ! – पुजार्यांची दावा

नाशिक – १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकेश्वर मंदिरातील श्री शंकराच्या पिंडीवर बर्फ जमा झाला आहे, असे पुजार्यांनी सांगितले. सध्या आसाममध्ये महापूर आला आहे. ईशान्य भारतात संकट आल्यानंतर असा चमत्कार घडतो, असा दावा पुजार्यांनी केला आहे.
तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हालhttps://t.co/7olVuYvxHv
— Maharashtra Times (@mataonline) July 1, 2022
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात संत निवृत्तीनाथ मंदिर, कुशावर्त तीर्थ, ब्रह्मगिरी आदी स्थळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते. येथे अनेक भाविक पूजाविधीसाठी येतात. या मंदिरात मुख्य पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. ‘सीसीटीव्ही’चे चित्रण पडताळून त्या पिडींवर खरेच बर्फाचा गोळा सिद्ध झाला आहे ? कि या पाठीमागे दुसरे काही कारण आहे ?, हे शासकीय अधिकारी पडताळत आहेत. ‘सीसीटीव्ही’चे चित्रण समोर आल्यानंतरही याविषयीची माहिती समजू शकणार आहे.
वर्ष १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळीही शिवपिंडीवर जमा झाला होता बर्फ !
यापूर्वी वर्ष १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी असा बर्फ शिवपिंडीवर जमा झाल्याचे सांगण्यात आले.
कोणत्याही कारणास्तव मला माझा (हिंदु) धर्म सोडता येणार नाही !
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त
LPG Price Hike : घरगुती सिलिंडर २९ रुपयांनी महागला
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !