
नवी देहली – काश्मीर खोर्यात सातत्याने होणार्या हिंदूंच्या हत्यांना पाकिस्तान उत्तरदायी असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले. आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये आरंभलेल्या हिंदूंच्या हत्यासत्राविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३ जून या दिवशी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिली. या बैठकीस गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह आदी उपस्थित होते. ‘काश्मीरमधील हिंसाचाराची पातळी वाढली आहे; पण तो जिहाद नाही. (काश्मीरमध्ये वर्ष १९९० पासून केवळ हिंदूंना लक्ष्य करून त्यांना ठार मारले जात असून त्यांना पलायन करण्यास भाग पाडले जात आहे, हा जिहाद नाही, तर काय आहे ? जर मुसलमानांना खुश करण्यासाठी प्रशासकीय अधिकार्यांकडून अशा प्रकारचे विचार मांडले जात असतील, तर तो हिंदूंचा विश्वासघात आहे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक) हिंसाचार करणारे सीमेपलीकडे पाकिस्तानात बसले आहेत’, असे सरकारच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. (जर हे ठाऊक आहे, तर पाकवर कारवाई का केली जात नाही ? कि पाकिस्तानने हिंदूंना ठार मारत जावे आणि आपण निष्क्रीय रहावे, असे सरकारी यंत्रणांना वाटते ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|
लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या
सीमावर्ती जिल्ह्यांतील लोकसंख्याशासत्रीय पालटांचा अभ्यास करा ! – Amit Shah
Mobile Tower Theft : बिहारमध्ये चोरट्यांनी ४० मीटर उंच ‘मोबाईल टॉवर’च चोरून नेला !
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील कर्मचार्याच्या घरी सापडले १० लाख रुपये : शेणाच्या ढिगार्याखाली लपवली रोकड
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात