मुसलमानांनी ३ विवाह करू नये !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे आवाहन

गौहत्ती (आसाम) – मी मुसलमानांना आवाहन करतो की, त्यांनी ३ विवाह करू नये आणि अवैधरित्या तलाकही देऊ नये. त्यांनी एकच विवाह करावा आणि २ मुलेच जन्माला घालावी. यातच त्यांचे भले आहे, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले. मुलींना मुलांप्रमाणे संपत्तीमध्ये बरोबरीचा वाटा दिला पाहिजे, तसेच ५० टक्के भाग पत्नीला दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

असे केवळ आवाहन करून कुणीही त्याचे पालन करणार नसल्याने यासाठी सरमा यांनी त्यांच्या पक्षाच्या केंद्र सरकारला लवकरात लवकर समान नागरी कायदा करण्यास, तसेच लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्यास सांगितले पाहिजे !