‘१८.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या हाताच्या दंडाच्या डाव्या बाजूकडील त्वचेमध्ये सोनेरी आणि चंदेरी रंगांचे दैवी कण आढळले. त्यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये काळानुसार श्रीविष्णूचे अवतारी तत्त्व प्रगट झाल्यामुळे त्यांच्या स्थूल देहात विविध प्रकारचे दैवी पालट होणे !
परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाला त्यांच्यातील अवतारी तत्त्व पूर्णपणे प्रकट होऊन कार्यरत होत असते. जेव्हा त्यांच्यातील अवतारी तत्त्व प्रकट होते, तेव्हा त्यांच्या देहामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व कार्यरत झाल्यामुळे त्यांच्या देहामध्ये दैवी पालट होतात.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी शुद्ध चैतन्य आणि कार्यरत चैतन्य यांचे प्रक्षेपण होणे !
पृथ्वीवर ज्ञानशक्तीच्या बळावर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये अवतारी तत्त्व कार्यरत झाल्यामुळे त्यांच्या देहातून शुद्ध चैतन्य आणि कार्यरत चैतन्य प्रक्षेपित होत आहे. शुद्ध चैतन्याच्या प्रक्षेपणामुळे पृथ्वीच्या वायुमंडलाची शुद्धी होते आणि कार्यरत चैतन्यामुळे पृथ्वीवरील जिवांना धर्माचरण अन् साधना करण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळते.
३. शुद्ध चैतन्यातून चंदेरी रंगाचे कण आणि कार्यरत चैतन्यातून सोनेरी रंगाचे दैवी कण त्यांच्या देहाच्या त्वचेमध्ये निर्माण होऊन त्यांचे वायूमंडलात प्रक्षेपण होणे !
शुद्ध चैतन्यातून चंदेरी रंगाचे कण आणि कार्यरत चैतन्य यांतून सोनेरी रंगाचे दैवी कण त्यांच्या देहातील त्वचेमध्ये निर्माण होऊन त्यांचे वायूमंडलात प्रक्षेपण होत आहे. परात्पर गुरुदेवांच्या देहातून प्रक्षेपित होणाऱ्या दैवी कणांतून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे मानवी देहातील श्रीविष्णूचे ज्ञानावतार आहेत आणि त्यांचा देह त्यांच्या कार्याप्रमाणेच दैवी आहे’, हे सूत्र सुस्पष्ट होते.
कृतज्ञता
श्रीगुरूंच्या कृपेमुळेच त्यांच्या देहामध्ये होणाऱ्या दैवी पालटांविषयी सूक्ष्मातून ज्ञान मिळून त्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव उलगडतो’, यासाठी मी श्रीगुरूंच्या पावन चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०२२)
|
शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !