
वणी (यवतमाळ), १३ मे (वार्ता.) – येथील टागोर चौकातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात ९ मे या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा भावपूर्ण वातावरणात पार पडली. हिंदु धर्मावर धर्मनिरपेक्षतेच्या आडून येणारी संकटे, तसेच धर्मांधांकडून होणारी आक्रमणे यांविषयी सभेत जागृती करण्यात आली. सभेसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे साहाय्य लाभले.

सनातन संस्थेच्या सौ. मंगला दरवे म्हणाल्या, ‘‘मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आहेत. मंदिर सरकारीकरणामुळे पूजा-अर्चा करण्यावर बंधने लादली जात आहेत. मंदिरे सरकारच्या तावडीतून सोडवण्यासाठी आपण हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होऊया.’’ समितीचे श्री. प्रफुल्ल टोंगे यांनी घटनेमध्येही हिंदूंवर कसा अन्याय झाला आहे, याविषयी सांगितले.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !