सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे मागितले उत्तर !

गेली ५० वर्षे पाकच्या कह्यात युद्धबंदी असणार्‍या मेजरच्या सुटकेचे प्रकरण

गेली ५० वर्षे याविषयी काहीच न करणार्‍या सर्वपक्षीय सरकारांना हे लज्जास्पद ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – वर्ष १९७१ च्या युद्धात पाककडून युद्धबंदी करण्यात आलेले मेजर कंवलजीत सिंह यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पत्नीकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यावर न्यायालयाने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे.

न्यायालयाने या वेळी म्हटले की, हे एक महत्त्वाचे प्रकरण आहे.