३१ मार्चपासून देशात कोरोनाचे निर्बंध रहित होणार ! – केंद्र सरकार

मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचा नियम कायम

नवी देहली – केंद्र सरकारने येत्या ३१ मार्चपासून कोरोनाच्या संदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र मुखपट्टी (मास्क) आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे नियम कायम असणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.