हिजाबची मागणी करणार्‍यांचे आजोबा पाकमध्ये गेले असते, तर त्यांना हिजाब सहज मिळाला असते ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – हिजाबच्या वादामुळे मुसलमान विद्यार्थिनी शाळेवर बहिष्कार घालत आहेत आणि ‘प्रथम हिजाब आणि नंतर शिक्षण’, असे म्हणत आहेत. मी विचार करतो की, त्यांच्या आजोबांनी (फाळणीच्या वेळी) पाकिस्तानला जाण्याऐवजी भारतात रहाण्याचा निर्णय का घेतला ? ते तेव्हाच गेले असते, तर हिजाबची मागणी करणार्‍यांना हिजाब सहज मिळाला असता, असे ट्वीट भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केला आहे.