कारागृहातील विचारधीन बंदीवानांच्या संख्येत वाढ याचा अर्थ एकतर त्यांच्यावर कारवाई होत आहे किंवा त्यांच्यावर खटला चालवण्यात दिरंगाई केली जात आहे !

नवी देहली – देशातील कारागृहांमध्ये खटला चालू न झालेल्या, म्हणजेच विचाराधीन बंदीवानांच्या संख्येत वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या कारागृहाविषयीच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालात म्हटले आहे की, वर्ष २०१५ मध्ये देशातील कारागृहांमध्ये विचाराधीन बंदीवानांची संख्या ४ लाख १३ सहस्र इतकी होती, ती वर्ष २०२० मध्ये ४ लाख ३८ सहस्र इतकी झाली आहे. ही वाढ १७.१ टक्के आहे.

उत्तरप्रदेशातील कारागृहात सर्वाधिक बंदीवान
या अहवालानुसार वर्ष २०२० मध्ये उत्तरप्रदेशातील कारागृहांत सर्वाधिक, म्हणजे १ लाख ६ सहस्र, बिहारच्या कारागृहांत ५१ सहस्र ८४९, मध्यप्रदेशात ४५ सहस्र ४५६ बंदीवान होते. देशातील कारागृहातील एकूण बंदीवानांपैकी २२ टक्के बंदीवान केवळ उत्तरप्रदेशातील कारागृहांमध्येच आहेत. बिहारमध्ये १०.७ टक्के, तर मध्यप्रदेशात ९.४ टक्के आहेत.
B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना