एस्.टी. कर्मचार्यांच्या संपाचे प्रकरण

नाशिक – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी महामंडळाच्या कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य करतांना म्हटले, ‘‘कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण यांच्यातील मध्यम मार्ग मी सुचवला असून सरकारने निर्णय घ्यावा.’’ फडणवीस एका कार्यक्रमासाठी नाशिक येथे आले असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, महामंडळाच्या कर्मचार्यांविषयी राज्य सरकारची भूमिका जीवघेणी आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह झालेल्या बैठकीत प्रवासी कर न्यून केल्यास सरकारकडून केवळ १०० कोटी रुपये घ्यावे लागतील, असे सुचवण्यात आले. याच बैठकीत कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण यांतील मध्यममार्ग सुचवला आहे.’’
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे