|
सेवाग्राम (जिल्हा वर्धा) – हिंदुत्व म्हणजे शीख किंवा मुसलमान यांना मारहाण करणे आहे, असे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले. (त्रिपुरा येथे मशीद पडल्याच्या कथित घटनेविषयी धर्मांधांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढून हिंसाचार केला, ते कोण होते ? – संपादक) ते सेवाग्राम येथे काँग्रेसच्या ४ दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या प्रारंभी बोलत होते. अखलाकची हत्या करणे हेही हिंदुत्व होते का ?, असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. देशभरातील ३० राज्यांतील काँग्रेसचे २०० निवडक पदाधिकारी या शिबिरात सहभागी झाले आहेत.
राहुल गांधी पुढे म्हणाले की,
१. हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून यातील भेदांचा शोध घेण्याची अन् समजून घेण्याची आवश्यकता आहे. (बांगलादेशात हिंदूंची घरे जाळण्यात आली, त्यांना वेचून ठार करण्यात आले, काश्मीर येथे हिंदूंचा नरसंहार करण्यात आला, ते कोण होते ? त्याला काय म्हणतात ? हेसुद्धा राहुल गांधी यांनी सांगावे. अशा घटनांच्या वेळी राहुल गांधी मूग गिळून गप्प बसतात आणि सोयीस्कर घटनांचा उल्लेख करून केवळ हिंदुत्वालाच अपकीर्त करतात, हे हिंदूंनी ओळखले आहे ! – संपादक) या गोष्टी अशा आहेत की, ज्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्या समजून घेण्यासाठी लोकांचा एक गट विकसित करणे आवश्यक आहे. (हिंदुत्व समजून घेण्यासाठी आधी काँग्रेसींनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांविषयी क्षमा मागितली पाहिजे, हिंदूंची हरप्रकारे हानीभरपाई केली पाहिजे आणि कठोर प्रायश्चित्त घेतले पाहिजे. त्यानंतरच हिंदु धर्म समजून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. – संपादक)
२. मी उपनिषदे वाचली आहेत आणि ‘तुम्ही निरपराध माणसाला मारावे’, असे कुठेही उपनिषदांत लिहिलेले नाही.