पूर्णिया (बिहार) येथे धर्मांधांकडून हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण

देशात ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना !

बिहारपासून केरळपर्यंत सर्वत्र ‘लव्ह जिहाद’च्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. हिंदु मुलींना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. असे असतांनाही त्याविरोधात राष्ट्रीय स्तरावर काहीच उपाययोजना काढली जात नाही. त्यामुळे या देशात अजूनही मुघल राजवट आहे कि काय, असे हिंदूंना वाटल्यास नवल नाही ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

पूर्णिया (बिहार) – जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’ची घटना समोर आली आहे. येथील कसबा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे २ नोव्हेंबर या दिवशी महंमद शकील आणि महंमद अफसर आलम यांनी अपहरण केले. यासंदर्भात पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली; परंतु अद्याप मुलीचा शोध लागलेला नाही.

पीडितेच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांशी बोलतांना सांगितले की, २ नोव्हेंबर या दिवशी माझी मुलगी मैत्रिणीसमवेत महाविद्यालयामध्ये गेली होती; परंतु महाविद्यायातून घरी परतत असतांना ती संशयास्पदरित्या गेरूआ चौकातून बेपत्ता झाली आहे. आम्ही मुलीचा शोध घेतला. तेव्हा आम्हाला समजले की, कसबा संतनगर वार्ड क्रमांक २ येथील महंमद शकील आणि महंमद अपसार आलम उपाख्य छोटू यांनी तिचे बलपूर्वक अपहरण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महंमद शकील हा नियमितपणे युवती रहात असलेल्या भागात जात असे. त्या भागातील लोकांनी शकीलची चौकशी केली असता, त्याने लोकांना स्वतःचे नाव सोनू आणि वडिलांचे नाव भोला साह असे सांगितले होते. लोकांच्या मते धर्मांधाने त्याची खरी ओळख लपवून मुलीला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढले आहे.