काश्मीरमध्ये २४ घंट्यांत ५ आतंकवादी ठार

२ – ५ आतंकवाद्यांना ठार करत बसण्यापेक्षा त्यांचा निर्माता असलेल्या पाकलाच नष्ट करा ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पुंछ सेक्टरमध्ये ११ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या चकमकीत ५ भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. या घटनेला २४ घंटे पूर्ण होण्यापूर्वीच सैन्याने ५ आतंकवाद्यांना ठार केले आहे.

शोपिया येथील इमामसाहब परिसरातील तुलरान येथे सैन्यदल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाच्या ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. यापूर्वी भारतीय सैन्यदलाने अनंतनाग आणि बांदीपोरा येथे २ आतंकवाद्यांना ठार केले.