११ वी अणि १२ वी इयत्तांच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्यास शिक्षण खात्याची मान्यता

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – कोरोना महामारीशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून राज्यातील उच्च माध्यमिक शाळांना ११ वी अणि १२ वी इयत्तांच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्यास शिक्षण खात्याने मान्यता दिली आहे. यासाठी शिक्षक खात्याने प्रत्येक वर्गात वर्गाच्या क्षमतेच्या तुलनेत निम्म्या क्षमतेने मुलांना बसवणे, कोरोना प्रतिबंधक लसीची मात्रा घेतलेल्यांनाच शैक्षणिक प्रकल्पात प्रवेश देणे आदी निर्बंध घातले आहेत.