देशात कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना ५० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – देशात कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. ३० दिवसांत ही रक्कम देण्यास न्यायालयाने सांगितले आहे. याआधी न्यायालयाने अशा कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपये देण्याचा केंद्र सरकारला आदेश दिला होता, परंतु केंद्र सरकारने त्यासंदर्भात असमर्थता दर्शवली होती. लक्षावधी कुटुंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे देणे शक्य नसल्याचे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले होते.