आसाममधील धर्मांधांच्या अतिक्रमणावर केलेल्या कारवाईमुळे  पाकिस्तानचा थयथयाट !

पाककडून अतिक्रमणविरोधी कारवाईचा ‘मुसलमानविरोधी हिंसा’ असा चुकीचा उल्लेख !

भारताच्या अंतर्गत प्रश्‍नात वारंवार नाक खुपसणार्‍या पाकला भारताने त्याला समजेल अशा भाषेत खडसावले पाहिजे !

इस्लामाबाद – आसाममधील दरांग जिल्ह्यातील धौलपूर येथे धर्मांधांनी सरकारी भूमीवर केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलीस यांच्यावर सहस्रो धर्मांधांनी आक्रमण केले. यात पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात सद्दाम हुसेन आणि शेख फरीद ठार झाले. धर्मांधांवर कारवाई केल्यामुळे पाकने थयथयाट केला आहे. पाकने तेथील भारतीय उच्चायुक्तांना बोलावून, ‘आसाममध्ये मुसलमानांना लक्ष्य केले जात आहे. भारताने या ‘मुसलमानविरोधी हिंसे’ची चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे’, असे सांगितले.