हिंदुद्वेषी झारखंडी मुक्ती मोर्चा सत्तेत असलेल्या झारखंड हिंदूंच्या धर्मांतराचा अड्डा बनला आहे. ख्रिस्ती प्रचारक प्रलोभने दाखवून आणि फूस लावून आदिवासींचे धर्मांतर करतात. त्यामुळे प्रथा परंपरा पाळणारे मूळ आदिवासी आणि त्यांना तुच्छ लेखणारे धर्मांतरित आदिवासी यांच्यात संघर्ष निर्माण होणे, स्वाभाविक आहे. त्यामुळे धर्मांतर हा गुण्यागोविंदाने नांदणार्या भारतीय समाजाला लागलेला एक कर्करोग आहे. तो अधिक पसरण्यापूर्वी केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे ! – संपादक

रांची (झारखंड) – पश्चिम सिंहभूममधील दुरुला गावामध्ये एका धर्मांतरित आदिवासी कुटुंबात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर आदिवासी समाजाने त्यांच्या ससन दिरी स्मशानभूमीमध्ये हा मृतदेह पुरण्यास विरोध केला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्या कुटुंबाच्या घराच्या अंगणामध्ये मृतदेह पुरण्यात आला.
१४ सप्टेंबर या दिवशी ही घटना घडल्याचे समजते. संबंधित कुटुंबाने मृतदेह पुरण्यासाठी तेथील ‘हो’ समाजाच्या ससन दिरी स्मशानभूमीमध्ये खड्डा खोदण्यास प्रारंभ केला. तेव्हा अन्य आदिवासी लोकांनी त्यांना थांबवले. याविषयी गावकर्यांनी आदिवासी ‘हो’ समाज युवा महासभेच्या लोकांना सूचना दिली. त्यानंतर गावामध्ये एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ‘संबंधित कुटुंबातील मृतदेहाला स्मशानभूमीमध्ये पुरता येणार नाही’, असा निर्णय झाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोेचले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर धर्मांतरित कुटुंबाने त्यांच्या घराच्या अंगणात मृतदेह पुरण्याचा निर्णय घेतला. ‘हो’ समाजाच्या मते, आदिवासी कुटुंबाने धर्मांतर केल्यानंतर त्याच्या कुटंबातील व्यक्तीच्या मृतदेहाला समाजाच्या ससन दिरी स्मशानभूमीमध्ये पुरता येणार नाही.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !