६०० जनावरे वाहून गेली, तर १० लोकांच्या मृत्यूची शक्यता !

जळगाव – जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ३० ऑगस्ट या दिवशी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे गिरणा धरणाखालील नदी, उपनद्या आणि नाले यांना पूर आला. ४ गावांना पुराचा वेढा पडला असून त्यात दोघे अडकले आहेत. ‘एस्.डी.आर्.एफ्.’चे पथक बचाव कार्यासाठी रवाना झाले आहे. कन्नड घाटात दरड कोसळल्याने घाटरस्ता बंद करण्यात आला आहे. या तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास ६०० जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जनावरे वाहून गेल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. १० लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


चाळीसगाव तालुक्यातील १५ गावांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पिकांसह शेती वाहून जाण्याची शक्यता असून नदीवरील पुलाचे संरक्षक लोखंडी कठडे वाहून गेले आहेत. विजेचे खांबही उन्मळून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन