नगरपालिकेला मुख्याधिकारी नसणे हे गंभीर आहे. मुख्याधिकार्यांची नेमणूक त्वरित होणे अपेक्षित आहे. – संपादक

बारामती – गेल्या दहा दिवसांपासून बारामतीमध्ये कोरोनाच्या संसर्गात वाढ होत आहे. ग्रामीण भागातील तपासण्यांपेक्षा शहरातील तपासण्यांचे प्रमाण पुष्कळच अल्प आहे. तपासण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या असल्या तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बारामती नगरपालिकेस मुख्याधिकारी नाही. रस्ते दुरुस्तीसह नगरपालिकेशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय पूर्णवेळ अधिकारी नसल्याने मागे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीला लवकरात लवकर मुख्याधिकारी मिळावा अशी मागणी होत असली तरी खरोखरीच प्रशासकीय कारणांमुळे ही नियुक्ती रखडली आहे की, त्यामागे इतरही काही कारण आहे याची चर्चा शहरात चालू आहे. महापालिकेकडे सक्षम अधिकारी नसल्याने नगरपालिकेच्या वसुलीच्या कामावरही त्याचा परिणाम होत असून निधीअभावी विकासकामेही रखडली आहेत.
संपादकीय : ‘तेज’स कि मागास ?
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !
माळेगाव मक्ता (नांदेड) येथे वादळी वार्यामुळे १५ ते २० लाख रुपयांची हानी !
तुळजापूर येथे निष्क्रीय पोलीस प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण !
मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडित !
राजापूर पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामावरून नगर परिषदेत सर्वच नगरसेवक आक्रमक