पूरग्रस्तांसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पाठवणार २५ सहस्र साड्या !

पूरग्रस्त किंवा आपत्काळात साहाय्य केल्याच्या अन्य पंथियांच्या बातम्या वाचायला मिळत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – कोकण, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून २५ सहस्र साड्या पाठवण्यात येणार असून, या निर्णयाविषयी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी मंदिर संस्थानचे अभिनंदन केले आहे. १५ ऑगस्ट या दिवशी पालकमंत्री शंकरराव गडाख जिल्हा दौर्‍यावर होते. या वेळी त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या समितीला कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना देवीच्या २५ सहस्र साड्यांचे साहाय्य पाठवण्याचे आवाहन केले होते. पालकमंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत मंदिर संस्थानने या २५ सहस्र साड्यांचे साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे.