पुराने वेढल्यामुळे स्थलांतरित झालेल्यांना मिळणार १० सहस्र रुपये सानुग्रह अनुदान ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

प्रतीकात्मक छायाचित्र

सांगली, १२ ऑगस्ट – जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या पूर्वी पूरस्थितीमुळे ज्या नागरिकांचे ४८ घंट्यांपेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र, घर बुडाल्यामुळे हानी झाली आहे अशांनाच १० सहस्र रुपये अनुदान देण्यात आले होते. आता ही अट शिथिल करण्यात आली असून ज्या नागरिकांचे घर, क्षेत्र पुराने वेढल्यामुळे त्यांना स्थलांतरित व्हावे लागले अशांनाही आता १० सहस्र रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.