‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे पत्रकार मनीषकुमार सिंह यांची भूमीच्या वादातून गळा चिरून हत्या

महंमद आलम आणि त्याचे साथीदार यांना अटक

  • बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
  • ‘हिंदुत्वनिष्ठ वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची हत्या भूमीच्या वादातून झाली कि धर्माच्या ?’ याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे !

चंपारण (बिहार) – येथील मठलोहिया या गावामध्ये सुदर्शन न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीचे पत्रकार मनीषकुमार सिंह यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे महंमद आलम आणि त्याचे साथीदार यांना अटक केली आहे. सिंह गेल्या ३ दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह गावातील एका खड्ड्यामध्ये सापडला. भूमीच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. भूमीच्या वादावरून २५ जुलैला महंमद आलम याच्यासह १३ जणांच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला होता.