महाराष्ट्रातील एका विद्यापिठाचा समावेश
बोगस विद्यापिठे स्थापन होऊन चालू असेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? – संपादक

नवी देहली – विद्यार्थी, पालक, सर्वसामान्य जनता आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे विद्यापीठ अनुदान आयोगाने (‘यु.जी.सी.’ने) देशातील २४ स्वयंघोषित विद्यापिठांना बोगस घोषित केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली. (तक्रारी आल्यावर नव्हे, तर स्वतःहून सतर्कतेने माहिती घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)
UGC declares 24 self-styled institutes as fake universities.https://t.co/hXxCvh4SC9
— Zee News English (@ZeeNewsEnglish) August 3, 2021
१. उत्तरप्रदेश राज्यात सर्वाधिक ८ बोगस विद्यापिठे आहेत. यामध्ये वाराणसीतील वाराणसी संस्कृत विद्यापीठ, प्रयागराजमधील महिला ग्राम विद्यापीठ, अलीगडमधील नेताजी सुभाषचंद्र बोस मुक्त विद्यापीठ, प्रतापगडमधील महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विद्यापीठ, नोएडातील इंद्रप्रस्थ शिक्षण परिषद आदींचा समावेश आहे.
२. देहलीमध्ये ७, ओडिशा आणि बंगाल येथे प्रत्येकी २, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि पुद्दुचेरी येथे प्रत्येकी १ बोगस विद्यापीठ आहे. महाराष्ट्रात नागपूरमधील सेंट जॉन्स विद्यापिठाचा यात समावेश आहे.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण