
कोल्हापूर, २१ जुलै (वार्ता.) – गेले दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेचे पाणी नदीच्या पात्राबाहेर पडले आहे. आज दुपारी राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३२ फूट नोंदवण्यात आली. रंकाळा तलाव्याच्या पाण्यातही वाढ होत असून तलावातील पाणी सांडव्यावरून वहात आहे. पावसामुळे काही उपनगरांमधील वीज खंडित होत असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हवामान खात्याने पुढील ४८ घंटे अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आला आहे.
Kolhapur : कोल्हापुरात संततधार; यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर#maharashtrarainupdate #kolhapur @vijaykesarkar https://t.co/jjI4eBiXSZ
— ABP माझा (@abpmajhatv) July 21, 2021
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर एके ठिकाणी वडाचे मोठे झाड कोसळ्याने दोन घंटे वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने झाड तोडून वाहतूक चालू केली.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !