
मुंबई – इयत्ता १० वीचा निकाल १६ जुलैला घोषित होणार आहे. हा निकाल दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पहाता येणार आहे. इयत्ता ९ वीमध्ये मिळालेले ५० टक्के गुण आणि इयत्ता १० वीच्या वर्षभरात अंतर्गत मूल्यमापनाचे ५० टक्के गुण एकत्र करून हा निकाल सिद्ध करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले होते. त्यानुसार शाळांनी मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सिद्ध करून विषयनिहाय गुण विद्यार्थ्यांना देऊन हा निकाल बोर्डाकडे पाठवला. त्यानंतर बोर्डाकडून शाळेकडून आलेल्या निकालावर योग्य ते काम करून हा निकाल घोषित करण्याचे ठरवले आहे. या निकालाविषयी विद्यार्थी समाधानी नसल्यास त्यांना परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
उत्पन्नवाढीसाठी हॉटेल्सना केले जाणार एस्.टी.चे अधिकृत बसथांबे !
संस्कारमूल्ये रुजवतांना आध्यात्मिक साधनेमुळे नाडकर्णी कुटुंबियांना झालेला अद्वितीय लाभ !
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !