
मुंबई – इयत्ता १० वीचा निकाल १६ जुलैला घोषित होणार आहे. हा निकाल दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पहाता येणार आहे. इयत्ता ९ वीमध्ये मिळालेले ५० टक्के गुण आणि इयत्ता १० वीच्या वर्षभरात अंतर्गत मूल्यमापनाचे ५० टक्के गुण एकत्र करून हा निकाल सिद्ध करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले होते. त्यानुसार शाळांनी मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सिद्ध करून विषयनिहाय गुण विद्यार्थ्यांना देऊन हा निकाल बोर्डाकडे पाठवला. त्यानंतर बोर्डाकडून शाळेकडून आलेल्या निकालावर योग्य ते काम करून हा निकाल घोषित करण्याचे ठरवले आहे. या निकालाविषयी विद्यार्थी समाधानी नसल्यास त्यांना परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !