
सातारा, १४ जुलै (वार्ता.) – शिवकालीन राजमार्ग कास पठार ते माचूतर, महाबळेश्वर हा रस्ता पूर्ववत् चालू रहावा, यासाठी सह्याद्री कोयना संघर्ष समिती (४३ गावे) यांच्या वतीने सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि सातारा-जावळी विधानसभेचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये म्हटले आहे, सध्या कास पठार ते माचूतर हा शिवकालीन राजमार्ग बंद आहे. तो पूर्वी जसा चालू होता, तसाच चालू ठेवावा. डोंगरमाथ्यावरील लोकांसाठी ते सोयीचे होईल. या भागातील पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून या रस्त्याला विशेष महत्त्व आहे. या भागातील जवळपास सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे; मात्र वनविभागाच्या सीमेतील १०० ते १५० मीटर रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाही. तेही तातडीने पूर्ण करून द्यावे.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !