उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीत दोन्ही बाजूंच्या किमान २ प्रतिनिधींना बोलवणे आवश्यक ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांना निवेदन देतांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिलेले विद्यार्थी

कोल्हापूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची शिष्टमंडळे काल आणि आज मला भेटण्यास आले होते. या विद्यार्थ्यांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १३ जुलै या दिवशी बोलवलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गतच्या उमेदवारांच्या बैठकीस दोन्ही बाजूंच्या किमान २ प्रतिनिधींना बोलवणे आवश्यक आहे, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनानंतर सरकारला त्यांनी हे आवाहन केले आहे.