
कोल्हापूर, ५ जुलै – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी ८ दिवसांसाठी कोल्हापूर शहरातील निर्बंध हटवले आहेत. ५ जुलैपासून अत्यावश्यक सेवांसमवेत इतर सर्व दुकाने आणि आस्थापना चालू ठेवण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे. ही अनुमती ५ ते ९ जुलै या कालावधीत सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत देण्यात आली आहे. ८ दिवसांनंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापुरातील ‘पॉझिटिव्हिटी रेट’ आणि रुग्णसंख्या याविषयी प्रभारी जिल्हाधिकारी यांनी शासनाला दिलेले पत्र आणि जनभावनेचा विचार करून ८ दिवसासांठी निर्बंध हटवले आहेत. असे असले तरी सर्व काही चालू झाले आहे, असे समजून नागरिकांनी आवश्यकता नसतांना घराबाहेर पडू नये, तसेच विनाकारण गर्दी करू नये. यामुळे जर रुग्णसंख्या वाढली, तर शासनाला पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय दुर्दैवाने घ्यावा लागेल.’’
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात