
कोल्हापूर, ५ जुलै – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी ८ दिवसांसाठी कोल्हापूर शहरातील निर्बंध हटवले आहेत. ५ जुलैपासून अत्यावश्यक सेवांसमवेत इतर सर्व दुकाने आणि आस्थापना चालू ठेवण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे. ही अनुमती ५ ते ९ जुलै या कालावधीत सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत देण्यात आली आहे. ८ दिवसांनंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापुरातील ‘पॉझिटिव्हिटी रेट’ आणि रुग्णसंख्या याविषयी प्रभारी जिल्हाधिकारी यांनी शासनाला दिलेले पत्र आणि जनभावनेचा विचार करून ८ दिवसासांठी निर्बंध हटवले आहेत. असे असले तरी सर्व काही चालू झाले आहे, असे समजून नागरिकांनी आवश्यकता नसतांना घराबाहेर पडू नये, तसेच विनाकारण गर्दी करू नये. यामुळे जर रुग्णसंख्या वाढली, तर शासनाला पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय दुर्दैवाने घ्यावा लागेल.’’
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !