
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ जून या दिवशी राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ७९ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काही मासांपासून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये धुसफुस चालू आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी राज्यपालांवर टीकाही केली आहे. राज्य सरकारने विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी १२ सदस्यांच्या नावांची सूची पाठवून ६ मास झाले, तरी राज्यपालांकडून सदस्यांची नियुक्ती झालेली नाही. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत विधानपरिषदेत राज्यपालनियुक्त सदस्यांचा विषय मांडला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे, याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल