मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ जून या दिवशी राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ७९ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काही मासांपासून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये धुसफुस चालू आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी राज्यपालांवर टीकाही केली आहे. राज्य सरकारने विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी १२ सदस्यांच्या नावांची सूची पाठवून ६ मास झाले, तरी राज्यपालांकडून सदस्यांची नियुक्ती झालेली नाही. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत विधानपरिषदेत राज्यपालनियुक्त सदस्यांचा विषय मांडला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे, याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > मुख्यमंत्र्यांनी राजभवन येथे जाऊन दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
मुख्यमंत्र्यांनी राजभवन येथे जाऊन दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
नूतन लेख
- काणकोण बाजार बंद करण्यामध्ये संघटनेचा सहभाग नाही, संघटनेच्या विरोधात काही जणांकडून अपप्रचार
- ‘एक देश एक निवडणूक’ चर्चा का आवश्यक ?
- भाडेकरू पडताळणी न केल्यास घरमालकाला १० सहस्र रुपये दंड ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
- थोडक्यात महत्त्वाचे : आरे वसाहतीतून बाहेर आला अजगर !… पालघर येथे एस्.टी. गाड्यांची दुर्दशा !…
- तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंत चरबीयुक्त तेल मिसळणार्यांवर कठोर कारवाई करावी !
- अक्षय शिंदेचा अंत्यसंस्कार अखेर उल्हासनगरमध्ये