आंदोलकांनी महामार्गावर पेटवले टायर

सोलापूर – उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय अधिकृतरित्या रहित करावा, या मागणीसाठी उजनी धरण पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी २४ मे या दिवशी उपरी (तालुका पंढरपूर) येथे पंढरपूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले.
सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरसाठी संमत केलेले ५ टी.एम्.सी. पाणी त्वरित रहित करून तसा शासन आदेश काढावा, या मागणीसाठी २४ मे पासून पंढरपूर येथे या आंदोलनाचा प्रारंभ झाला. पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, तसेच दीपक वाडदेकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यातील शेतकर्यांनी आंदोलन चालू केले आहे. इंदापूरसाठी संमत केलेले पाणी रहित करावे, अन्यथा याहून तीव्र आंदोलन केले जाईल, अशी चेतावणीही सचिव माऊली हळणकर यांनी या वेळी दिली.
महाबळेश्वर येथील हनुमान मंदिराचा मार्ग ‘द क्लब’ व्यवस्थापनाकडून खुला
हिंजवडी (पुणे) येथे लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
ठाणे येथे सीरवी समाजाच्या कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती
नवी मुंबई महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास प्रारंभ !
Protest In POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनतेचे पाकिस्तान आणि त्याचे सैन्य यांच्या विरोधात आंदोलन
महिलेला गर्भवती करून सोडून दिले : गुन्हा नोंद